श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात १४७ व्या श्रींच्या पुण्यतिथी चा सोहळा

श्री दिगंबरा दिगंबरा…. श्रीपाद वल्लभ दिगंबरा….! श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त… सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज कि… जय !, श्रीक्षेत्र अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय…च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात १४७ व्या श्रींच्या पुण्यतिथी निमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी पहाटे रथोत्सव, विधीवत पूजा, धार्मिक कार्यक्रम, पारायण, महाप्रसाद, रक्तदान, व जिम्नॅशियमचा १७ वा वर्धापन दिन, मान्यवरांच्या भेटी व सत्कार आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. अन्नछत्र मंडळात लाखो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतले. न्यासाने केलेल्या नेटक्या नियोजनाने भक्तातून समाधान व्यक्त करण्यात आले असून, अन्नछत्र मंडळात भक्तीचा मळा फुलला..! देश-विदेशातून भक्तांची मांदियाळी..! स्वामी नामाने न्यासाचा परिसर दुमदुमून गेला होता.

दरम्यान श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न्यासाकडून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सालाबादा प्रमाणे ह्या ही वर्षी गेल्या ६ दिवसपासून श्री स्वामी समर्थ रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रथोत्सवाचा शेवट दिवस असल्याने सर्व अमोलराजे मित्र मंडळ व स्वामीभक्तांनी रात्रो १.३० वाजता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात उपस्थित राहून श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील पूजनानंतर न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते रथाचे पूजन करुन बुधवार पेठेतील श्री स्वामी समर्थ समाधी मठाकडे पालखी मार्गावरून रथ मार्गस्थ करण्यात आले.

महाप्रसादालयात सकाळी स्वामींचे चरित्र पोती पारायण संपन्न झाले. सकाळी ११.३० वा. श्री व अन्नपूर्णा, महाप्रसादाचे पूजन आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृह राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे व मनसेचे राज्य उपाध्यक्ष विनायक (बंटी) म्हशीलकर, डॉ प्रसाद प्रधान, ठाणे, केदारनाथ रामपुरी, बेंगलोर, रॉयल कारभार ग्रुप महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरज पाटोळे, कराड यांच्यासह स्वामी भक्तांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अन्नछत्र मंडळातील नैवेद्य श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर, बुधवार पेठेतील समाधी मठात श्रींना दाखविण्यात आले. यावेळी शेकडो स्वामीभक्त उपस्थित होते.

न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या मंत्र पठणाने महाआरती संपन्न झाली व आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या हस्ते संकल्प सोडण्यात आल्यानंतर भक्तांना महाप्रसाद देण्यात आला. अन्नछत्र मंडळातील परिसरातील रक्तपेढीच्या माध्यमातून न्यासाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते.

श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशिर्वादाने न्यास हे विविध विकास कामांच्या बाबतीत आघाडी घेतलेली आहे. यासह न्यासाने स्वामीभक्त व शहरवासियांच्या सोयीकरिता इन व आऊट डोअर व्यायाम शाळा उपलब्ध करुन दिलेली आहे. आजवर यास उत्स्फूर्त प्रसाद मिळाला आहे. यापैकी इनडोअर असलेल्या मातोश्री श्रीमंत कांतामती विजयसिंहराजे भोसले जिम्नॅशियम सेंटरच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री हनुमान मूर्तीचे पूजन अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

१४७ व्या श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधुन अनेक मान्यवरांनी अन्नछत्राला भेट दिल्या. अन्नछत्र मंडळात हजारो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतले. स्वामी भक्तांमुळे झालेल्या गर्दीमुळे अन्नछत्र परिसर फुलून गेलेला होता. स्वामी भक्तांनी अन्नछत्र मंडळाच्या परिसरात असलेल्या श्री शमी-विघ्नेह गणेश मंदिर, ब्रह्मांडनायक उभी स्वामींची मूर्ती, नियोजित महाप्रसादगृह इमारत, सध्याचे अद्यावत तात्पुरते महाप्रसादालय, कपिला गाय, कारंजा, शिवस्मारक, कार्यरत यात्री निवास -१ , यात्रीभुवन-२ , अतिथी गृह, आऊटडोअर व इनडोअर जीम, प्रशस्त वाहनतळ, टेकडीवरील श्री समर्थ वाटिका, शिवचरित्र प्रदर्शन हॉल, अग्निशमन, रुग्णवाहिका, आश्रयदाते कक्ष हे सर्व न्यासाने भक्तांच्या सेवेर्थ सुरु केलेल्या विविध उपक्रमांचे स्वागत करुन न्यासाचे कौतुक केले. परगावच्या आलेल्या पालख्यांचे स्वागत न्यासाच्या वतीने करण्यात आले.

चौकट :
देश-विदेशातून भक्तांची मांदियाळी..! :
महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, आंद्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, केरळ, गुजरात, उत्तराखंड, दिल्ली व जम्मू काश्मीर पंडीत, कलकाता, राजस्थान, उत्तरप्रदेश वाराणसी यासह देश व विदेशातील स्वामी भक्तांनी तीर्थक्षेत्री श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात येऊन लाखो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतले.

चौकट :
स्वामी भक्तातून समाधान :
श्री क्षेत्र अक्कलकोट मध्ये आलेल्या स्वामी भक्तांना उच्चांकी तापमानामुळे अन्नछत्र मंडळात महाप्रसादाबरोबरच थंडगार मठ्ठा देण्यात आला. याबरोबरच भक्तांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता महाप्रसादालयात एअर कुलर सिस्टीम व समोर ग्रीन नेटची सोय करण्यात आल्याने स्वामी भक्तातून समाधान व्यक्त करण्यात आले.

चौकट :
महाप्रसादाची वेळ वाढवली :
न्यासाने श्रींच्या पुण्यतिथीनिमित्त येणाऱ्या स्वामी भक्तांना अन्नछत्र मंडळाच्या वतीने दुपारी ५ वाजेपर्यंत महाप्रसाद देण्याची तर रात्रीचा देण्यात येणारा महाप्रसाद देखील उशिरापर्यंत भाविकांच्या सेवेर्थ ठेवण्यात आल्याने न्यासाच्या या कार्याबद्दल भक्तातून कृतज्ञता : व्यक्त करण्यात आल्या.

चौकट :
न्यासाकडून महाप्रसादाचे उत्कृष्ठ नियोजन :
देव दर्शनासाठी देशातील विविध राज्यात जाण्याचा योग आला. श्रींच्या पुण्यतिथी दिनाच्या दिवशी श्रीक्षेत्र अक्कलकोटला आलो असता, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात लाखो स्वामी भक्त महाप्रसादाकरिता आलेलो होतो. त्याठिकाणी न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून महाप्रसादाचे उत्कृष्ठ नियोजन व व्यवस्थापन पाहून समाधान झालो.
-नितीन पोतदार, स्वामी भक्त, डॉ. नायर रोड, आग्री पाडा, बृहन्मुंबई

याप्रसंगी संस्थान नागेश्वर तालुका भोकरदन, जि. जालना येथील गजिंद्र महाराज चव्हाण, सी.के. जाधव, नकुल काळे, मारुतीराव जगताप, प्रभाकर पाटील-सोनुले, व मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, राजेंद्र लिंबीतोटे, संतोष भोसले, मनोज निकम, न्यासाचे लेखापरीक्षक ओंकारेश्वर उटगे, अप्पा हंचाटे,यांच्या सह माजी नगरसेवक- रामचंद्र समाणे, किशोर सिद्धे, संजय गोंडाळ, रोहित खोबरे, रोहित मोरे, धनंजय गाढवे, नागेश कलशेट्टी, सौरभ मोरे, वैभव मोरे, अशोकराव (मामा) जाधव, गणेश पाटील, प्रदीप पाटील, बसवराज दोडमनी, शिवराज मंगरुळे, निखील सलगोंडा, शिवशरण इजगे, प्रा. शिवशरण अचलेर, प्रा. मनोज जगताप, अतिश पवार, प्रथमेश पवार, शुभम कामनुरकर, अथर्व कामनुरकर, विकी जाधव, स्वामिनाथ बाबर, सचिन स्वामी, नन्नु कोरबू, मैनुद्दीन कोरबू, सरफराज शेख, फरीद जमादार, प्रशांत विभूते, महादेव अनगले, पिंटू साठे, प्रवीण घाडगे, गणेश भोसले, विजय तथा गोटू माने, निखील पाटील, भारत पाटील, कांत झिपरे, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, गोरखनाथ माळी, नामा भोसले, शहाजीबापू यादव, सतिश महिंद्रकर, बाळासाहेब घाडगे, मल्लिकार्जुन बिराजदार, दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, समर्थ घाडगे, समर्थ चव्हाण, देवा हंजगे, विठ्ठल रेड्डी, किरण साठे, शिवकुमार स्वामी, संभाजीराव पवार, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, रमेश हेगडे, राजू पवार, गोविंदराव शिंदे, किरण शिंदे, दिलीप ननवरे, मल्लिनाथ कोगणुरे, शावरेप्पा माणकोजी, स्वामिनाथ बाबर, मलंग मकानदार, काशिनाथ वाले, राहुल इंडे, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.