श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत मंडळाकडून स्वामी भक्तांकरिता सतत विविध विधायक कार्याच्या माध्यमातून सेवा समर्पित कार्याने पुढे जात आहे., भक्त केंद्रस्थानी म्हणूनच न्यासाचे प्रत्येक कार्य यशस्वी रित्या पूर्ण होत आहे, स्वामी भक्तांच्या श्रद्धेचा धार्मिक उत्सव अन्नछत्र मंडळाच्या परिसरात पहायला मिळतो. सत्य, न्याय, सेवा, समता आणि बंधुतेचा संदेश मंडळाचा आहे. व्यापक उद्धीष्टांसाठी कार्यक्षम निर्णय न्यासाकडून घेतले जात असल्याने, श्री क्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर पडणाऱ्या न्यासाच्या आवारात नवीन भव्य महाप्रसादालय उभारत असून, याचे ग्राउंड फ्लोअर सॅल्याबचे पूजन गुरुवारी श्री गणेश जयंतीच्या मुहूर्तावर न्यासाचे विश्वस्त अलकाताई जनमेजयराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्पिताराजे अमोलराजे भोसले व तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले यांच्या हस्ते विधिवत संपन्न झाले.
या कार्यक्रमास स्वाती निकम, स्मिता कदम, रूपा पवार, सुवर्णा घाटगे, कविता वाकडे, अनिता गडदे, छाया पवार, तृप्ती बाबर, कविता भोसले, स्वप्ना माने, उज्वला भोसले, संगीता भोसले, आशा पाटील, हर्षदा पवार, संध्या सूर्यवंशी, दिव्या मोरे, विजयालक्ष्मी लोणी, वैशाली यादव, मंगल पाटील, विनता पाटील न्यासाचे सचिव शामराव मोरे, विश्वस्त लक्ष्मण पाटील, सौरभ मोरे, अप्पा हंचाटे, साई सुश्रृत डेव्हलपर्स एल.एल.पी. पुणे चे मुख्य अभियंता- रामदास तांबे, मुख्य अधिकारी- प्रशांत काळे, प्रकल्प व्यवस्थापक- राजेंद्र पाटील, कनिष्ठ अभियंता- ऋषिकेश शिंदे, प्रकल्प व्यवस्थापक- रमाकांत कोष्टी, अमर बोंद्रे, बाबू चौगुले यांच्या सह आतिष पवार, गोटू माने, प्रवीण घाडगे, रमेश हेगडे, बाळासाहेब घाडगे, नामा भोसले, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, बाबुशा महिंद्रकर, विनायक भोसले, सागर पवार, शंकर पोतदार, समर्थ चव्हाण, यांच्या सह स्वामी भक्त, पदाधिकारी, सेवेकरी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. विधिवत पूजा न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, सोमकांत कुलकर्णी यांच्या मंत्र पठणाने संपन्न झाली.
तळमजला सल्याब एम-३५ श्रेणीचे कॉक्रीट टाकण्याचा शुभारंभ अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावर तर पूजन श्री गणेश जयंती दिवशी करण्यात आले.
सदर होणारी नवीन महाप्रसाद गृहाची इमारत भव्य आणि मंदिर सदृश्य असणार आहे. ही इमारत पूर्णपणे वातानुकुलित असून, या इमारतीचे बांधकाम क्षेत्र १ लाख १९,३९८ चौरस फुट असणार आहे. इमारतीच्या टेरेसवर श्री स्वामी समर्थांची ५१ फुटांची सुंदर, रेखीव आणि भव्य मुर्ती, सर्वांचे लक्ष वेधून घेईल. या महप्रसादगृहात २५०० भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था असून, एकूण ५ हजार भाविकांसाठी बसून सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा प्रतिक्षा कक्षाचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय या इमारतीच्या तळघरामधे धान्य- भाजीपाला कोठार, चटणी व पिठाची गिरणी तसेच १ तासामध्ये ८०० चपाती तयार करता येणाऱ्या ७ मशिन्स, आणि भांडे धुण्यासाठी डिश वॉशर यांची देखील सोय आहे. संपूर्ण इमारतीमध्ये अग्निशामन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. ही सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज व प्रशस्त इमारत, स्वामी भक्तांच्या देणगीतून साकार होणार असून, या बांधकामाचा सर्वसाधारण अंदाजे खर्च रुपये ६० कोटी, इतका अपेक्षित आहे. गेल्या नोव्हेंबर-२०२४ पासून सदरचे काम प्रगतीपथावर आहे, येत्या २ वर्षात हे महाप्रसादगृह भक्तांच्या सेवेत असणार आहे.



